शहर भागात 37(1)(3) कलम लागू
प्रकाशन दिनांक : 03/03/2021
औरंगाबाद, दिनांक 02 (जिमाका): औरंगाबाद शहर भागात शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 च्या 37 (1) व (3) कलमान्वये जिल्ह्याच्या शहरी हद्दीत दिनांक 14 मार्च 2021 पर्यंत शस्त्रबंदी आणि जमावबंदी आदेश लागू केला आहे, असे डॉ. निखील गुप्ता, पोलीस आयुक्त, औरंगाबाद शहर यांनी कळविले आहे.