शहर भागात 37(1)(3) कलम लागू
प्रकाशन दिनांक : 21/04/2019
औरंगाबाद,दि.०५ (जिमाका)- औरंगाबाद शहर भागात शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ च्या ३७ (१) व (३) कलमान्वये जिल्हयाच्या शहरी हद्दीत दिनांक ३० एप्रिल २०१९ पर्यंत शस्त्रबंदी आणि जमावबंदी आदेश लागू करण्यात आल्याचे पोलीस उपायुक्त डॉ.दीपाली धाटे-घाडगे यांनी कळविले आहे.
*****