बंद

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळातर्फे शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याचे आवाहन

प्रकाशन दिनांक : 04/08/2020

औरंगाबाद,दि.4 (जिमाका) – साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या वतीने सन 2020- 21 या शैक्षणिक वर्षात 10 वी, 12 वी, पदवी, पदयुव्युत्तर, वैद्यकीय, व अभियांत्रिकी इत्यादी अभ्यासक्रमामध्ये मातंग समाज व तत्सम 12 पोटजातीच्या विद्यार्थी / विद्यार्थीनी यांना शिष्यवृत्तीचे वितरण करण्यात येणार आहे. इच्छुक मातंग/ मांग समाजातील विद्यार्थी यांनी 9 ऑगस्ट 2020 पर्यंत अर्ज सादर करावेत, असे जिल्हा व्यवस्थापक, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ, (मर्या.) औरंगाबाद यांनी प्रसिध्दी पत्राव्दारे कळविले आहे.

शिष्यवृत्तीसाठी सरासरी 60 टक्के किंवा त्यापेक्षा जास्त टक्केवारीने गुण मिळवणाऱ्या जिल्ह्यातील प्रथम 3 ते 5 विद्यार्थीस निधीच्या उपलब्धतेनुसार शिष्यवृत्तीचे वितरण करण्यात येणार आहे.

अर्जासोबत जातीचा दाखला, मार्क मेमो, पुढील वर्गामध्ये प्रवेश घेतल्याबाबतचा पुरावा, आधार कार्ड, पासपोर्ट साईज फोटो इत्यादी कागदपत्रे जोडावीत. परिपूर्ण अर्ज साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ, (मर्या.)डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, खोकडपुरा , औरंगाबाद येथे 9 ऑगस्ट पर्यंत सादर करावेत, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक, औरंगाबाद यांनी केले आहे.