शहर भागात 37(1)(3) कलम लागू
प्रकाशन दिनांक : 17/12/2020
औरंगाबाद,दि.16 (जिमाका) – औरंगाबाद शहर भागात शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस आयुक्त, डॉ. निखील गुप्ता औरंगाबाद शहर यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 च्या 37 (1) व (3) कलमान्वये जिल्ह्याच्या शहरी हद्दीत दिनांक 29 डिसेंबर 2020 पर्यंत शस्त्रबंदी आणि जमावबंदी आदेश लागू केला आहे.