बंद

शहर भागात 37 (1)(3) कलम लागू

प्रकाशन दिनांक : 19/11/2020

       औरंगाबाद, दि.18 (जिमाका) :- औरंगाबाद शहर भागात शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी महाराष्ट्र  पोलीस अधिनियम 1951 च्या  37 (1) व (3) कलमान्वये  जिल्ह्याच्या  शहरी हद्दीत दिनांक 29 नोव्हेंबर 2020 पर्यंत  शस्त्रबंदी आणि जमावबंदी  आदेश  लागू केला आहे, असे पोलीस उप आयुक्त, (मुख्यालय) औरंगाबाद शहर यांनी कळविले आहे.