शहर भागात 37 (1)(3) कलम लागू
प्रकाशन दिनांक : 19/11/2020
औरंगाबाद, दि.18 (जिमाका) :- औरंगाबाद शहर भागात शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 च्या 37 (1) व (3) कलमान्वये जिल्ह्याच्या शहरी हद्दीत दिनांक 29 नोव्हेंबर 2020 पर्यंत शस्त्रबंदी आणि जमावबंदी आदेश लागू केला आहे, असे पोलीस उप आयुक्त, (मुख्यालय) औरंगाबाद शहर यांनी कळविले आहे.