बंद

पाठ्यपुस्तक मंडळाच्या विभागीय भांडारांचा व्यवहार 30 सप्टेंबरपर्यंत बंद

प्रकाशन दिनांक : 24/09/2020

औरंगाबाद, दि.24 (जिमाका) : –  पाठ्यपुस्तक मंडळाकडे नोंदणीकृत झालेल्या सर्व मुद्रक ,बांधणीकार व पुस्तक विक्रेते तसेच शैक्षणिक संस्था इत्यादिंना कळविण्यात येते की, दि. 26 ते 30 सप्टेंबर 2020 या कालावधीत पुस्तके, कागदची, वार्षिक प्रत्यक्ष साठा मोजणी होणार असल्याने या कालावधीत मंडळाची विभागीय भांडारे गोरेगाव, पुणे, नागपूर, औरंगाबाद, लातूर, नाशिक, कोल्हापूर, पनवेल व अमरावती येथील सर्व व्यवहार (आवक-जावक विक्री इत्यादी) बंद राहणार असल्याचे भांडार व्यवस्थापक, पाठ्यपुस्तक भांडार व वितरण केंद्र, औरंगाबाद यांनी कळविले आहे