बंद

दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी परीक्षा ७ एप्रिल रोजी

प्रकाशन दिनांक : 05/04/2019

औरंगाबाद, दि.०३ (जि.मा.का.) :- महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत, औरंगाबाद जिल्हा केंद्रावर दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यादंडाधिकारी प्रथम वर्ग परीक्षा-२०१९ रविवार, दि. ०७ एप्रिल २०१९ रोजी सकाळी १० ते १२ या वेळेत घेण्यात येणार आहे. ही परीक्षा औरंगाबाद शहरातील १७७ उपकेंद्रावर होणार आहे. परीक्षेसाठी ४२०० उमेदवारांना प्रवेश देण्यात आला आहे. परीक्ष केंद्रे औरंगाबाद शहरातील असून ती शासकीय ज्ञान-विज्ञान महाविद्यालय, शासकीय सुभेदारी विश्रामगृहाजवळ, विश्वासनगर, औरंगाबाद, मौलाना आझाद कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, (टॉम पॅट्रीक इमारत, भाग-अ) रोझा बाग, हर्सूल रोड, औरंगाबाद, मौलाना आझाद कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, (टॉम पॅट्रीक इमारत, भाग-ब) रोझा बाग, हर्सूल रोड, औरंगाबाद, डॉ.रफिक झकेरिया कॉलेज फॉर वुमेन, नवखंडा, जुब्ली पार्क, औरंगाबाद, डॉ.सौ.इंदिराबाई भास्करराव पाठक महिला कला महाविद्यालय, समर्थनगर, औरंगाबाद, विवेकानंद कला व सरदार दिलिपसिंह वाणिज्य महाविद्यालय, समर्थनगर, औरंगाबाद, विवेकानंद विज्ञान महाविद्यालय, समर्थनगर, औरंगाबाद, एस.बी.इ.एस. कॉलेज ऑफ आर्टस ॲण्ड कॉमर्स, औरंगपूरा, औरंगाबाद, एस.बी.इ.एस.कॉलेज ऑफ सायन्स, औरंगपुरा, औरंगाबाद, सरस्वती भुवन मुलांची शाळा, औरंगपुरा, औरंगाबाद, माणिकचंद पहाडे विधी महाविद्यालय, समर्थनगर औरंगाबाद याप्रमाणे आहेत.

परीक्षा कक्षात प्रवेश मिळविण्यासाठी उमेदवारांनी स्वत:चे आधार कार्ड, निवडणूक आयोगाचे ओळखपत्र, पासपोर्ट, पॅनकार्ड किंवा स्मार्ट कार्ड प्रकारचे ड्रायव्हींग लायन्स यापैकी किमान कोणतेही एक ओळखपत्र व त्यांची छायांकित प्रत सोबत आणणे अनिवार्य आहे.

            परीक्षा कक्षामध्ये ९:३० वाजेनंतर उमेदवारास कोणत्याही परिस्थितीत प्रवेश दिला जाणार नाही. परीक्षेच्या वेळी कक्षात प्रवेशप्रमाणपत्र, काळ्या व निळ्या शाईचे बॉल पॉइंट पेन, ओळखपत्र व ओळखपत्राची छायांकित प्रत या व्यतिरिक्त अन्य कोणतेही साहित्य अथवा वस्तु परीक्षा कक्षामध्ये घेऊन जाण्यास उमदेवारास परवानगी असणार नाही.

            उमेदवाराने त्याच्या सोबत डिजीटल डायरी, मायक्रोफोन, मोबाईल, ब्ल्यु टूथ, कॅमेराफोन किंवा तत्सम कोणतेही संदेशवहन उपकरण कोणतेही इलेक्ट्रॉनिक साहित्य परीक्षाकक्षामध्ये घेवून जाण्यास सक्त मनाई आहे. असे साहित्य आणले तर उमेदवारांना स्वत:च्या जबाबदारीवर परीक्षा केंद्राच्या आवाराच्या मुख्य दरवाजाबाहेरच ठेवावे लागेल. तसेच असे साहित्य ठेवण्याची जबाबदारी आयोगाची असणार नाही. परीक्षा केंद्राच्या आवाराच्या मुख्य दरवाजाच्या आत असे साहित्य आणल्यास उमेदवारांवर फौजदारी व प्रशासकीय कारवाईसह त्यांना आयोगाच्या आगामी परिक्षांकरीता बंदी घालण्यात येईल. परिक्षा केंद्राच्या प्रवेशदारावरच परीक्षेच्या दिवशी उमेदवाराची तपासणी पोलीसामार्फत करण्यात येणार आहे. परीक्षेच्या पर्यवेक्षणाकरीता आयोगाचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत. यामध्ये  ४ हजार २०० उमेदवारांना प्रवेशपत्रे पाठविण्यात आली असून, या परीक्षेच्या कामासाठी ४६३ अधिकारी, कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली असल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत प्रसिद्धी पत्राद्वारे कळविण्यात आले आहे.

******