जिल्ह्यातील मनाई आदेश 28 फेब्रुवारीपर्यंत लागू
प्रकाशन दिनांक : 03/02/2021
औरंगाबाद, दिनांक 02 (जिमाका): आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 व फौजदारी दंड प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 (1) (3) मधील तरतुदीनुसार औरंगाबाद जिल्ह्यासाठी (पोलीस आयुक्त, (शहर) औरंगाबाद यांचे कार्यक्षेत्र वगळून) जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आदेशान्वये लागू केलेले मनाई आदेश यापुढे 28 फेब्रुवारीपर्यंत लागू करीत आहे. पोलीस आयुक्तालय क्षेत्राबाबत पोलीस आयुक्त (शहर) औरंगबाद यांचे आदेश अंमलात राहतील, असे जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी सुनील चव्हाण यांनी निर्गमित केलेल्या आदेशात म्हटले आहे.
शासन अधिसूचनेनुसार साथरोग अधिनियम खंड 2 (1) नुसार कोविड-19 वर नियंत्रण आणण्यासाठी व त्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यासाठी महानगरपालिका आयुक्त यांना सक्षम प्राधिकारी म्हणून घोषित करण्यात आले आहे. तसेच मुख्य सचिव यांचे पत्रानुसार आयुक्त महानगरपालिका, औरंगाबाद यांना औरंगाबाद महानगरपालिका क्षेत्रामध्ये बाजार, दुकाने यांचे पत्रानुसार आयुक्त महानगरपालिका औरंगाबाद यांना औरंगाबाद महानगरपालिका क्षेत्रामध्ये लॉकडाऊनबाबत आयुक्त, महानगरपालिका औरंगाबाद यांचे आदेश लागू राहतील.
सदर आदेशाचे पालन न करणाऱ्या व्यक्ती, संस्था अथवा समूह यांचे विरूद्ध आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 चे कलम 51 ते 60 तसेच भा.दं.वि. 1860 चे कलम 188 नुसार कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल. या आदेशाची अंमलबजावणी करीत असताना सद्हेतूने केलेल्या कृत्यासाठी कुठल्याही अधिकारी व कर्मचारी यांच्यावर कुठल्याही प्रकारची कायदेशीर कारवाई कारवाई अथवा खटला दाखल करता येणार नाही, असेही आदेशात नमूद आहे.