बंद

ग्रामीण भागात 37(1)(3) कलम लागू

प्रकाशन दिनांक : 23/08/2021

औरंगाबाद, दिनांक 23 (जिमाका) : औरंगाबाद ग्रामीण भागात शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हादंडाधिकारी  औरंगाबाद   यांनी मुंबई  पोलिस अधिनियम 1951 च्या  37(1) (3) कलमान्वये  जिल्ह्याच्या  ग्रामीण हद्दीत दिनांक 31 ऑगस्ट 2021  पर्यंत  शस्त्रबंदी आणि जमावबंदी  आदेश  लागू केला आहे, असे जिल्हादंडाधिकारी औरंगाबाद यांनी कळविले आहे.