ग्रामीण भागात 37(1)(3) कलम लागू
प्रकाशन दिनांक : 23/08/2021
औरंगाबाद, दिनांक 23 (जिमाका) : औरंगाबाद ग्रामीण भागात शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हादंडाधिकारी औरंगाबाद यांनी मुंबई पोलिस अधिनियम 1951 च्या 37(1) व (3) कलमान्वये जिल्ह्याच्या ग्रामीण हद्दीत दिनांक 31 ऑगस्ट 2021 पर्यंत शस्त्रबंदी आणि जमावबंदी आदेश लागू केला आहे, असे जिल्हादंडाधिकारी औरंगाबाद यांनी कळविले आहे.