ग्रामीण भागात ३७(१)(३) कलम लागू
प्रकाशन दिनांक : 05/04/2019
औरंगाबाद,दि.०३ (जिमाका) – औरंगाबाद ग्रामीण भागात शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हादंडाधिकारी औरंगाबाद यांनी मुंबई पोलिस अधिनियम १९५१ च्या ३७(१) व (३) कलमान्वये जिल्ह्याच्या ग्रामीण हद्दीत दिनांक १७ एप्रिल २०१९ पर्यंत शस्त्रबंदी आणि जमावबंदी आदेश लागू केला आहे, असे जिल्हादंडाधिकारी औरंगाबाद यांनी कळविले आहे.
******